Nashik : जगद्गुरु भगवान दत्तात्रेय यांच्या गुरुपरंपरेतील तसेच अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार स्थापन गुरुपीठावरील उत्तराधिकारी आणि सत्यधर्म प्रणेते परमसद्गुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी, अक्कलकोट) यांच्या श्री चैतन्य पादुकांचे नाशिकमध्ये आगमन होत आहे.
या पवित्र प्रसंगी भाविकांना आपल्या घरी श्रींच्या पादुकांचे पूजन करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने घरातील वातावरण शांत, समृद्ध आणि पवित्र व्हावे, तसेच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
घरी पूजन केल्याने काय लाभ होतात?
शास्त्रानुसार आणि श्रद्धेनुसार, श्रींच्या पादुकांचे पूजन केल्याने:
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते
ग्रह व वास्तुदोष कमी होण्यास मदत होते
मानसिक ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी होते
कुटुंबात शांती आणि समृद्धी वाढते
चालू असलेल्या श्री स्वामी सेवेला बळकटी मिळते
या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकतो, आणि प्रत्येक भाविकाला ही संधी मिळावी, हीच स्वामींची इच्छा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अग्निहोत्राचा संदेश
परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी जगाला अग्निहोत्राचा संदेश दिला आहे. ही प्राचीन वैदिक पद्धत असून, तांदूळ, तूप, गाईच्या गोवऱ्या, तांब्याचे पात्र आणि सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी विशेष मंत्रांसह अग्नीत आहुती दिली जाते.
अग्निहोत्रामुळे:
वातावरण शुद्ध होते
आरोग्य सुधारते
मानसिक स्थैर्य लाभते
युवकांसाठी विशेष आवाहन
यंदाच्या कार्यक्रमात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, “निरोगी पर्यावरण – निरामय जीवन” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संपर्क कसा साधावा?
ज्यांना श्रींच्या पादुकांचे पूजन आपल्या घरी आयोजित करायचे आहे, त्यांनी त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 डॉ. पल्लवी जोशी – 8668293671
📞 गौरव दीक्षित – 9923725001
📞 निलेश जोशी – 9822790508
📞 आनंदा ब्रह्मे – 7666951422
📞 श्री अण्णा वाले (सेक्रेटरी, शिवपुरी अक्कलकोट) – 7822064719











